Disha Shakti

Uncategorized

शाळा डिजिटल झाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार – रावसाहेब खेवरे

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (नाना जोशी) दि.16  : संगणक युगाच्या आगमनाने अनेक क्रांतिकारक बदल घडत आहे त्याचप्रमाणे विद्यालयात डिजीटल द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी संस्थेने जे पाऊल उचलले आहे ते प्रशंसनीय असून ही शाळा डिजिटल झाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार असल्याचे उद्गगार अहमदनगर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व विद्यालयाचे मार्गदर्शक रावसाहेब खेवरे यांनी व्यक्त केले.


15 ऑगस्ट अमृत महोत्सव कार्यक्रम राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व बालविद्या मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी विद्यालयात डिजिटल क्लासरूम व शैक्षणिक ॲपचे उद्घाटन यावेळी पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब खेवरे हे बोलत होते. शाळेच्या मैदानात परंपरेनुसार ज्येष्ठ शिक्षक पारस जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून विद्यालयाला डिजिटल टीव्ही मिळालेली आहे. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डिजिटल क्लासरूम उभारले आहे तसेच पालकांना आपल्या पाल्याचे शाळेतील माहिती दिसावे यासाठी अँड्रॉइड ॲप सुरू केले. डिजिटल क्लासरूम व ॲपचे उद्घाटन अमृत महोत्सव निमित्त खेवरे यांच्या हस्ते पार पडले.

खेवरे पुढे म्हणाले की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेचे युगात विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान मिळावे यासाठी संस्थेने डिजिटल स्कूल सुरू केले हे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हितकारक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे. तसेच संस्थेने सुरू केलेल्या ॲपमुळे पालकापर्यंत आपल्या पाल्यांची माहिती घरबसल्या दिसू शकनार आहे. विद्यार्थ्यांसाठी विव्ह बोर्ड द्वारे शिक्षण देण्याचे जे पाऊल संस्थेने उचलले आहे त्यामुळे नक्कीच भविष्यात या शाळेतील विद्यार्थी उच्च स्तरावर पोहोचतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संस्थेचे सहसचिव अनुप बिहाणी यावेळी म्हणाले की, डिजिटल क्लासरूम सुरू केल्यामुळे इयत्ता पाचवी ते दहावी सर्व विषयांचा अभ्यासक्रम तसेच प्रत्येक घटकावर सराव प्रश्न, खेळ व कृतीयुक्त व सराव प्रश्न याचा मुलांना फायदा होणार आहे. तसेच अँड्रॉइड ॲपमुळे पालकांना आपल्या पाल्याची वर्गातील दैनंदिन हजेरी, विद्यार्थ्यांना दररोज स्वाध्याय देऊन तो पूर्ण केला आहे की नाही हे देखील यामुळे पालकांना समजनार आहे.वर्गामध्ये घेतलेल्या विविध चाचण्यांचे मार्क पालकांना ॲप मध्ये पाहता येणार आहे. तसेच ॲपमध्ये पालकांना सर्व परीक्षांचे आपल्या पाल्याचे मूल्यमापन पालकांना कळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सागितले.

अमृत महोत्सव निमित्त विद्यालयात देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास अनाप यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. संजय भडके यांनी केले. कार्यक्रमास सचिव मनोज बिहाणी, सतिश बिहाणी, प्रभावती बिहाणी, सुशीला बिहाणी, आरती बिहाणी, रिता बिहाणी, पूजा बिहानी, उप मुख्याध्यापिका मंजेरी देशपांडे, पर्यवेक्षक आर.जे.पवार, बाल विद्यामंदिरचे मुख्यध्यापक गुलाब मोरे, संजय जंगम, विजय शिरसाठ, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!