नांदगाव शहर प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : नांदगाव तालुक्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली, व दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के पंचनामे करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला दिले.
या कामे लागणारी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढविणे साठी सूचना देखील आमदारांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आमदार साहेबांनी बोलठाण, जातेगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले असल्याचे पाहून आमदार साहेब भाऊक झाले. वर्षभर कष्ट व खर्च करून वाढवलेल्या पिकास नैसर्गिक आपत्तीने होत्याचे त्याचे नव्हते केले. झालेले नुकसान अतिशय व्याकुळ करणारे आहे. वेदनादायक आहे.
मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मलाही शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो धीर सोडू नका, आमदार व सरकार आपल्या पाठीशी आहे.लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई आपणास मिळवून देण्यात येईल, मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील ,असे आश्वासन यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ,तहसीलदार कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, सरपंच वाल्मीक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण ,गोकुळ कोठारी, गुलाब चव्हाण , मनोज रिंडे , अनिल सोनवणे, संदीप सूर्यवंशी , गणेश व्यवहारे , बंडू पाटील , भाऊसाहेब सूर्यवंशी , संतोष गायकवाड, गुलाब पाटील, शरद पवार ,सुभाष पवार, भारत गायकवाड व ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
HomeUncategorizedनांदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करण्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे शासकीय यंत्रणेला आदेश
नांदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करण्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे शासकीय यंत्रणेला आदेश

0Share