राहुरी तालुका प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : ब्राह्मणी (ता. राहुरी) : गावाजवळील वन विभागाच्या फॉरेस्ट परिसरात अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १२ नवजात जिवंत वासरे सोडून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.या वासरांवर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून काहींना जखमी केले, तर काहींचा मृत्यू झाला. काही वासरे अजूनही जिवंत असून त्यांची अवस्था गंभीर आहे. ही घटना सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. परिसरातील गोरक्षक आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जिवंत वासरांना कुत्र्यांपासून आणि कावळ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. घटनास्थळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तसेच ग्रामस्थांनी भेट दिली असून पुढील चौकशी सुरू आहे.
ब्राह्मणी येथे वनविभागाच्या हद्दीत संतापजनक प्रकार, अज्ञात व्यक्तींनी सोडली मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १२ नवजात जिवंत वासरे

0Share
Leave a reply