राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शिंगणापूर फाटा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने नामांकित चौकातील फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या फलकाचे अनावरण धनगर समाजाचे नेते श्री. विजुभाऊ तमनर, माजी सरपंच भानुदास तमनर सर, व्यापारी अनिल भिसे, पोपट शेंडगे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनीही चौकास भेट देत फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या. काही वर्षांपूर्वी या चौकाचे नामकरण झाले होते. आजच्या विशेष दिनाचे औचित्य साधून फलकाचे नव्याने उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शरद बाचकर, सुनील भिसे, उपसरपंच लहानु तमनर, रमेश खेमनर, रविंद्र भिसे, सागर माने (मनसे तालुकाध्यक्ष), भारत बाचकर, रोहित कोपनर, शुभम बोरकर, मयूर बोरकर, आदित्य जानकर, अजय बाचकर, कुंदन बाचकर, महेश मंचरे, सचिन ढोणे, सतीश लबडे, सोनू शेटे, लहू धनवटे, रवी तमनर, अखिल पठाण, योगेश पिसाळ, बापू होडगर, सोन्याबापू बाचकर, जितेंद्र माने, रोहित तमनर, महेंद्र तमनर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद बाचकर व सुनील भिसे यांनी पुढील वर्षी 31 मे रोजी याच ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली.
शिंगणापूर फाटा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त चौक फलकाचे अनावरण, पुढील जयंतीस स्मारक उभारले जाणार

0Share
Leave a reply