दिशाशक्ती पुणे / भारत कवितके : शनिवार दिनांक १० आगस्ट २०२४ रोजी पुणे येथील गंज पेठ, सावित्रीबाई फुले सभागृहा मध्ये सकल धनगर समाज बांधवांचे पहिले अधिवेशन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.या प्रसंगी ना नेता ना पक्ष आरक्षण हेच लक्ष या तत्त्वावर सकल धनगर समाजाच्या या अधिवेशनात धनगर समाजातील डॉ.शशिकांत तरंगे,दिपक बोराडे, नवनाथ पडळकर, उज्ज्वला हाके, अर्जुन दादा सलगर, प्रा.खडसे राम गावडे,वडतुके, पांडुरंग मेरगळ, रुक्मिणी गलांडे, विजय गोफणे, गणेश हाके आदी धनगर समाज बांधवांनी अधिवेशनात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.सकाळी ११ वाजता सुरू झालेले अधिवेशन संध्याकाळी ७ वाजता संपले, महाराष्ट्र राज्य च्या विविध भागातून धनगर समाज बांधव या अधिवेशनात उपस्थित होते.
या वेळी गणेश हाकेम्हणाले,” मी रोज अनेक पक्ष बदलू शकतो पण मी माझी धनगर ही जात बदलू शकत नाही., कोर्टाचा निर्णय धनगर समाजाच्या विरोधात गेला, राजकीय इच्छाशक्ती असेल तर आरक्षण जरुर मिळेल.” तर पांडुरंग मेरगळ म्हणाले,” आरक्षण हा प्रश्न राजकीय आहे.आंदोलन करताना मुंबई ला गृहीत धरु नये,त्याचा उपयोग ही नाही,” या अधिवेशनात ठेराली आले ते आपलेच बांधव आहेत पण येताना आपला वाटा घेऊन नाही आले, बिंदू नामावली मध्ये अनेक त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आंदोलन ची गरज आहे.पेशवांना पळविणारे रक्त हे धनगरांचे आहे.उपोषणाचे हत्यार आता बोथट झाले आहे.धनगरांनी एल्गार केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. १०००कोटीच्या योजनेची अंमलबजावणी व्हावी, चळवळीतील माणूस म्हणतो माणसे येतील माणसे येतील अशा भ्रमात राहतो पण माणसे येत नाहीत.अशा प्रकारची माहिती समाज बांधवांना मिळाली.
तसेच संजय वाघमोडे,राम गावडे व इतर समाज बांधवांनी या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.शेवटी सकल धनगर समाज च्या विजय गोफणे, गणेश केसरकर,बिरु कोळेकर व इतर कार्यकर्ते यांनी काही ठराव समाज बांधवांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले.आंदोलनाच्या बाबतीत मुंबई चे समाज बांधव कमी पडतात,असे पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले, मुंबई हून भारत कवितके, अड.वैभव गरगडे,गावडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.
Leave a reply