सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी सहाय्यक श्री. पी.टी. कुसळकर यांना गरुड फाउंडेशन व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अण्णासाहेब शिंदे सभागृहात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गडचिरोलीचे पोलीस आयुक्त मा.श्री संदीप भांड हे होते.
यावेळी अहिल्यानगरचे खासदार मा. श्री निलेशजी लंके , माजी मंत्री प्राजक्त तनपुरे , मा. श्री रावसाहेब खेवरे नाना, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष व आयोजक पत्रकार मा. श्री रमेश खेमनर गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, जावेद शेख, सोमनाथ वाघ, पत्रकार श्री. आर. आर. जाधव, सुनील कोकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
श्री. पी. टी. कुसळकर यांनी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील संशोधन केंद्रात बारा वर्ष सेवा कालावधीत “चवळी” या पिकांवर वेगवेगळे संशोधनात मदत करून या पिकाचे चार वाण विकसित आले आहे.त्यामध्ये फुले पंढरी, फुले विठाई, फुले रखुमाई व फुले सोनाली हे नवीन चार वाण विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. तसेच या व्यतिरिक्तही बियाणे उत्पादनात सोयाबीन, हरभरा आणि चवळी या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले आहे. तसेच त्यांनी चवळी व भुईमूग लागवड तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना अत्याधुनिक माहिती देण्यासाठी दोन्ही पिकांचे लेख प्रसिद्ध केलेले आहे.
सध्या ते कापूस सुधार प्रकल्प म.फु.कृ.वि., राहुरी येथील किटकशाय्व विभागात कार्यरत आहेत. कापूस सुधार प्रकल्प येथे रात्री अपरात्री पाटाच्या पाण्याचे योग्य व उत्कृष्ट नियोजन करून प्रकल्पातील सात कोटी लिटर क्षमता असलेले शेततळे भरून घेतलेले आहे. त्यामुळे शेततळ्यातील साठवून ठेवलेले पाणी पिकांना शाश्वत पाणी म्हणून देण्यासाठी उपयोगी पडत आहे. तसेच कापूस आध्यरेखा प्रात्यक्षिक विविध शेतकऱ्यांना लाभ देऊन त्यांचे उत्पादन वाढविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामातही मोठे भरीव योगदान दिलेले आहे.
तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी सहाय्यक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. कृषी सहाय्यक या केडरचे वेगवेगळे समस्यांचे निराकरण करून शासन स्तरावर चारही कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक केडरचे विविध समस्या सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात, त्यामुळे त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार घेण्यासाठी मोठ्या संख्येने कृषी, शिक्षण, संशोधन, पोलीसदल, शिक्षकवृंद विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक उपस्थित होते,
तसेच सामाजिक, राजकीय, शिक्षण, पत्रकारिता, वैद्यकीय विविध क्षेत्रातील आणि कापूस सुधार प्रकल्प येथील अधिकारी व सहकारी मित्र सह माजी मंत्री शंकररावजी गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी कुसळकर यांचे कौतुक केले आहे.
सोनईचे पी. टी. कुसळकर यांना कृषीक्षेत्रातील राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित

0Share
Leave a reply