राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : मुख्य समन्वयक पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीने राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर हे नाव द्यावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यांमध्ये जाऊन पंधरा दिवस नामांतर्गत यात्रा सुरू केली. या नामांतर यात्रेच्या माध्यमातून अकराशे ग्रामपंचायतचे ठराव. विद्यमान आमदार व खासदार सर्व पक्षांचा पाठिंबा विविध संघटनांचा पाठिंबा. सर्व जाती-धर्माच्या जनतेचा पाठिंबा. नामांतर कृती समितीच्या माध्यमातून मिळविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आले. आज राज्य सरकारने पाठविलेला नामांतराचा ठराव केंद्र सरकारने मंजूर केला याबद्दल केंद्र व राज्य सरकार यांचे नामांतर कृती समितीच्या वतीने शतशा आभारी आहे.
या नामांतराने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशामध्ये केलेल्या कामाचा गौरव करून त्यांच्या जन्मगाव असलेल्या जिल्ह्याला नाव दिल्याने या जिल्ह्याच्या लौकिकामध्ये मोठी भर घालणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने मा.विजय तमनर व सर्व समन्वयकांनी जाहीर आभार व्यक्त केले.
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण केल्याबद्दल विजय तमनर यांनी मानले राज्य सरकार व केंद्र सरकारचेजाहीर आभार

0Share
Leave a reply