Disha Shakti

Uncategorized

बजरंगदलाच्या संरक्षणामुळे एक गोवंशाला जीवदान 

Spread the love

 

राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : बजरंगदल लोणी शहर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याची भावना व जनतेच्या मनात असलेली बजरंग दलाच्या कार्याप्रति प्रेम यामुळेच जणावरे कत्तलीसाठी कसायांना न विकता, त्याचे जतन व संवर्धन करण्याची मोहीम सुरू केलीय, त्यामुळे लोणी व प्रवरापरिसरात अनेक शेतकऱ्यांनी बजरंगदलाशी सम्पर्क करून आपल्या कडे असलेले गोवंश कत्तली साठी न विकता, मोफत बजरंग दल यांच्या मार्फत गोशाळेत सोडत आहेत. त्याच आव्हानाला प्रतिसाद देत आज दिनांक ०१ जून २०२५ रोजी राजुरी येथील शेतकरी उमेश गावडे पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या कडील असलेली गोवंश बजरंग दल लोणी यांच्याकडे सुपूर्त केले व सर्व बजरंग दलाच्या बजरंगीनी त्यांना उज्वल गोरक्षण केंद्र मांची येथे सुखरूप पोहच केले.

यावेळी बजरंगदल अध्यक्ष सागर राक्षे,सागर उबाळे भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष हिना ताई उबाळे, छायाताई पेटारे व या कार्याप्रति दर वेळेस वाहतुकीसाठी मदत करणारे आपले प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!