Disha Shakti

इतर

राहुरीत कांद्याचा प्रश्नावरुन आंदाेलन चिघळलं ; स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी  : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढीची घोषणा मागे घ्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज (शुक्रवारी) राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर- मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. कांद्याला प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपये हमीभाव द्यावा यासह जाहीर केले ३५० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागण्या देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

यावेळी शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग रोखल्यामुळे अर्धा तास नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खाेळंबली होती. माध्यमांशी बाेलताना आंदाेलकांनी कांद्याला 2410 रुपये दर मान्य नसल्याचे नमूद केले. 40 टक्के निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.यावेळी पोलिसांनी आंदोलन न करण्याचे आवाहन शेतक-यांना केले. परंतु आंदाेलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले.

यामुळे पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले. काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आम्हांला जेलमध्ये टाका न्याय मिळणयासाठी प्रसंगी आंदाेलन तीव्र केले जाईल असा इशारा आंदाेलकांनी पाेलिस प्रशासनास दिला.दरम्यान स्वाभिमानीचे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले.

स्वाभिमानी  शेतकरी  संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांना आंदोलन स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला तसेच आंदोलकांनी महामार्गावर झोपून आंदोलन छेडल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना महामार्गावरून हटवले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!