यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : पोहंडूळ येथील गेल्या आठ दिवसांपासून फिल्टर वॉटर बंद असल्याने नागरिकांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याकडे सरपंच आणि ग्राम सचिव हे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी बाहेर गावून आणावे लागत आहे.
गावकरी या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून गेले असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. कोणताही वरिष्ठ अधिकारी यांची दखल का घेत नाहीत व नळ योजना ही पंधरा दिवसापासून बंद असल्याने नागरिक संतप्त होऊन शंभर मीटर अंतरावरून महिलांना वापरण्यासाठी पणी आणावे लागत आहे. महिलांनी पोहंडूळ सरपंच आणि सचिव यांनी योग्य ती दखल न घेतल्यास गटविकास अधिकारी यांनी सरपंच व सचिव यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.