अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील चिखलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण क्रांतीच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. आपल्या भारतीय इतिहासाला समाज सुधारणेचा वारसा लाभलेला असून १९ व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तवाचे कवच भेटून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील अपवादात्मक स्त्री क्रांतिकारकांमध्ये होती, त्यामध्ये सावित्रीबाई फुले या अग्रस्थानी आहेत.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. खंडुजी नवसे पाटील यांच्या घराण्यात झाला. सावित्रीबाई फुले यांनी उद्योग, जनसेवा, विद्वाता, स्त्री शिक्षण, सदाचरण,अस्पृश्यता आदी गोष्टीच्या जोरावर सावित्रीबाई फुलेनी थोरपणा मिळविला सामाजिक, शैक्षणिक कार्य करत असताना प्लेग या आजाराने पछाडलेल्या रोग्याची सेवा करत असतानी प्लेग हा आजार झाला आणि १० मार्च १९९७ रोजी देहवासन झाल आणि क्रांतीची मशाल विझली. या जयंती दिनी त्यांना त्यांच्या विचार कार्याला कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन.
यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक रोडे सर, म्हैसगाव केंद्राचे श्री. हनुमंत चौधरी, प्रभारी केंद्र प्रमुख श्री.विष्णू खामकर सर, श्री.नागटिळक सर, श्री.आंबेकर सर, श्री. राजाराम काकडे सर, श्री. सारोक्ते सर, श्री.ह.भ.प.गाडेकर महाराज सर, श्री. रानपाटील बाचकर आदी शिक्षक आणि शालेय विदयार्थी उपस्थित होते.
Leave a reply