प्रतिनिधी (गंगासागर पोकळे) दि.16 ऑगस्ट :
भारतीय स्वातंत्र्य लढ्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाले. देशभर स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवांची पर्वा न केलेल्या शूरवीर आणि विरांगणांच्या शौर्याचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. या जबाबदारीची जाणीव ठेवून ग्रामपंचायत कोळेवाडीने ध्वजारोहण करण्याचा सन्मान गावातील विधवा महिलांना दिला होता.
शाहिदांच्या पत्नीना आयुष्य विधवा म्हणून घालवावे लागले आहे. असे आयुष्य जगणे आणि समाज्यातील अपमानास्पद वागणूक भोगणे हे मरणप्राय असते. असे आयुष्य कोळेवाडी गावातील अनेक महिलांना जगावे लागत आहे. म्हणून या वर्षीचा ग्रामपंचायत चा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण आम्ही कोळेवाडीतील विधवा महिलांच्या हस्ते करण्याचे ठरविले होते. दिलेला सन्मान स्वीकारून सर्व विधवा महिलांनी ग्रामपंचायत चा ध्वज फडकविण्यासाठी उपस्थित राहिल्या या मध्ये श्रीमती संगीता गावराम तळपे, श्रीमती कौसबाई लक्ष्मण तळपे, श्रीमतीलहानबाई पाराजी आंबेकर, श्रीमती जनाबाई पांडुरंग नंदकर, श्रीमती शारदा राजू लहांगे, श्रीमती सुमनबाई सीताराम वायळ, श्रीमती नबबाई खेवजी वायळ इ. महिला उपस्थित होत्या.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव दलात पोलीस निरीक्षक म्हणून काम करणारे मा. बाळासाहेब कोरडे, मा. उपसभापती विजय आंबेकर, मा. उपसरपंच गंगुबाई कोरडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ नवले, आशा सेविका वंदना आंबेकर व मंदा नंदकर, तरुण कार्यकर्ते विवेक तळपे, बंडू वायळ, अक्षय कोरडे, गणेश गोंदके, ग्रामसेवक अरुण वाघमारे, जि.प. शाळा मुख्याध्यापक मा. सुभाष दातीर व शिक्षक संजय वायळ, सौ.नागपुरे मॅडम, कर्मचारी विजय पाचरणे, परेड प्रा. लहानु वायळ तसेच सुभाष नंदकर, कांतीलाल तळपे, गोरख कोकाटे, हेमंत मरभळ, सहादू कांबळे, उमाजी भांगे, रामनाथ लहांगे, भीमा भलिंगे इ. नागरिकांनी या आनंदाच्या क्षणी आवर्जून हजर राहून ध्वजाला मानवंदना दिली.
कोळेवाडी गावात गेल्या तीन महिन्यात लागोपाठ १५ व्यक्ती मयत झाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटे बहिरू नागु कांबळे यांचे निधन झाल्याने दुःखाच्या सावटाखाली ध्वजारोहण करून मयतास आदरांजली वाहून सरपंच डॉ जालिंदर घिगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला.