शेवगाव प्रतिनिधी /अविनाश देशमुख : दिनांक 20 जानेवारी रोजी शेवगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतक-यांना शासनाने जाहिर केलेले अनुदान त्वरीत वाटप करा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली देशातील भाजपा प्रणित मोदी सरकारने कापसाची परदेशातून आयात केल्याने शेतकर्यांच्या कापसाला मिळणारा बाजार भाव आयातीमुळे व व्यापार्यांच्या संगनमताने घसरलेला आहे.
देशातील सरकारने शेतकरी विरोधी धोरण घेतल्याने शेतक-यांना आपल्या पिकाला मिळणार्या हमीभावापासुन वंचित रहावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे असतांना आजवर शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. देशातील व राज्यातील सरकारने शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आणलेली आहे. तरी शेतक-यांच्या कापसाला किमान १२ हजार रूपये व तुरीला १० हजार रूपये भाव जाहिर करावा तसेच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे या मागणीचे निवेदन शेवगाव चे नायब तहसीलदार मयूर बेरड यांना देण्यात आले.
अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाकप राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे, राज्य कोन्सील सदस्य कॉ.संजय नांगरे, कॉ.भगवानराव गायकवाड, कॉ.दत्तात्रय आरे, कॉ.बबनराव पवार, कॉ.बबनराव लबडे, कामगार नेते कॉ.गोरक्षनाथ काकडे, कॉ.राम लांडे, कॉ.कारभारी शिंदाडे, कॉ.काका झिरपे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.