प्रतिनिधी / युनुस शेख : संगमनेर तालुक्यातील पठार भागात विशेष म्हणजे जांबूत, साकूर,बिरेवाडी या ठिकाणी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला त्याच बरोबर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. सविस्तर माहिती अशी कि साकूर येथे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांची तारांबळ उडाली. दोन दिवसांपासून ढगाळ व दमाट उष्णतेचे वातावरण तयार झाले होते,रविवारी रात्री च्या वेळी गारपीट झाली.
होळीचा सण असल्याने पंचक्रोशीत होळी साजरी करण्यासाठी नागरिकांनी व तरूण युवकांनी जय्यत तयारी केली मात्र जोरदार वाऱ्यासह पावसामुळे होळी साजरी करण्यात व्यत्यय आला. तसेच वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील कांदा, गहू,मक्का, आदी पिके भुईसपाट होऊन शेतकरी बंधूंचे हाताशी आलेले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .जांबूत परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून तेथील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव त्यात नैसर्गिक संकटाला सामना करावा लागत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटांसमोर जावे लागत आहे.