भारत कवितके / मुंबई प्रतिनिधी : रविवार दिनांक १३ आगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता कांदिवली मधील चारकोप या ठिकाणीं झुंजार धनगर समाज संस्थे च्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २२८ वी पुण्यतिथी चे आयोजन करण्यात आले होते. अखंड हिंदुस्थानभर लोककल्याणकारी मानवतावादी कार्य करुन अजरामर झालेल्या महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २२८वी पुण्यतिथी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी करुन विनम्र आभिवादनचे कार्यक्रम करण्यात येतात.
कांदिवली मध्ये सामाजीक शैक्षणिक सांस्कृतीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार धनगर समाज संस्थेच्या पदाधिकारी, सभासद, व समाज बांधव यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून विनम्र आभिवादन केले.
यावेळी कवि, गीतकार, माजी आमदार ना.धो.महानोर व विचारवंत व्याख्याते विविध चळवळीचे प्रणेते हरी नरके या दोन महान व्यक्तीना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी कांदिवली पश्चिम मधील जेष्ठ पत्रकार साहित्यिक सामाजीक कार्यकर्ते व झुंजार धनगर समाज संस्थेचे कार्य अध्यक्ष भारत कवितके यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील काही ठळक, महत्वपूर्ण घटना कथन केल्या.
यावेळी भारत कवितके, सौ.संध्या भांड, अनिता चांगण, सौ,जयश्री बाळू एकळ, डॉ.चिंतामणी कुचेकर संदिप बीरे,बाळू ( देवानंद) भांड, उमेश कुचेकर, रविंद्र भांड, प्रमोद भांड, फकिरा राहटळ, मंदार एकळ,अमोघ एकळ, रवंदळे, राकेश भांड, विशाल पिसे ज्योती भोजणे, गायत्री भांड विद्या बोधे संदिप भांड दशरथ गरगडे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता.