विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : गेले अनेक वर्षापासून कुकडीचे १ टी एम एम सी पाण्याची पठारभागाची मागणी ही केवळ कागदावर राहिल्याने पारनेर तसेच नगर तालुक्यांतील शेतकऱ्यांना आज दुष्काळाचा झळ्या सोसावे लागतात. याबाबतीत अनेकदा सर्वेक्षण झाले. परंतु पुढील कार्यवाही झाली नाही. सदर एक टी एम सी पाणी पारनेर – नगर तालुक्याला मिळाल्यास अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. याबाबतीत आपण पाट बंधारे विभागातून कार्यवाही करावी असे आशयाचे निवेदन मा. ना. विखे पाटील यांना बैठकीत दिले. याबाबतीत लवकरच पारनेर तालुक्यात तसेच मुंबई मध्ये बैठक लावणार असल्याचे मा. विखे पाटील यांनी सांगितले.
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पारनेरला पाण्याची भेट मिळेल अशी अपेक्षा सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केली.
कुकडी कालवा तसेच पिंपळगाव जोगा कालवा या दोन्ही बाबतीत पारनेर तालुक्यावर सातत्याने पाणी वाटपामध्ये अन्याय होत असतो. अनेक गावातील मायनर (उपचारी ) यांना गळती असल्यामुळे पाणी वाया जाते. तसेच कालवावरून पुलाची व्यवस्था नसल्याने अनेक किलोमीटर अंतरावरून मालवाहतूक करावी लागते. आवश्यक तेथे नवीन पुलासाठी निधीसह मंजुरी द्यावी. अश्या विविध प्रकारच्या मागण्या ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुजित झावरे पाटील यांनी केली.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा जल क्षेत्रामध्ये अतिशय गाढा असा अभ्यास आहे. त्याचा फायदा निश्चित पारनेरला मिळेल असा विश्वास मला वाटतो.
सुजित झावरे पाटील.
स्व.खासदार बाळासाहेब विखे पाटील तसेच स्व.आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे पारनेरच्या पाण्याचे प्रश्नाचे स्वप्न ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन साकार होणार : सुजित झावरे पाटील

0Share