प्रतिनिधी (रमेश खेमनर) निंबळक (नगर) दि.26 ऑगस्ट : जेऊर ग्रामपंचायत कडील १५ वित्त आयोगातून जिल्हा परीषद शाळेची लाईट बिल ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजुर झाला , आत्तापर्यत जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे गावात विकास कामे करता आले इथून पुढे मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सरपंच राजश्री मगर यांनी ग्रामसभेत सांगीतले.
जेऊर ( ता. नगर ) येथील सरपंच राजश्री मगर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अनेक मुद्द्यावर ग्रामस्थांनी आपले प्रश्न उपस्थित केले महत्वाचे ठराव ही घेण्यात आले. सरपंच मगर व ग्रामविकास अधिकारी राहुल गांगर्डे यांनी विकास कामाबाबत तसेच नागरिकांच्या अडी अडचणी बाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी शाळा , अंगणवाडी , दुरुस्ती तसेच गावातील तसेच वाडया वस्त्यावरील अंतर्गत रस्ते दुरुस्ती , जलशुध्दीकरण प्रकल्प शहीद जवान स्मारका जवळ घे़ण्यात यावा या विषयावर चर्चा झाली . तसेच केंद्र सरकारच्या घनकचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी मंजुर झालेल्या सत्तर लाख रुपायाधुन प्रकल्प उभारणे, जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी पुरवठा मंजुर झाली त्याचे काम चालू करणे , तसेच या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे पिंजरा लावण्यात यावा या विषयावर चर्चा झाली. वनरक्षक अशोक टापरे यानी बायजामाता मंदीर परिसरातील वृक्षारोपन व अनेक वनस्पती ची माहीती ग्रामस्थांना दिली.अनेक महत्त्वाचा ठराव यावेळी घेण्यात आले.
यावेळी नारायण तोडमल, अंबादास पवार, श्याम विधाते, अरुण बनकर, दत्ताभाऊ डोकडे , आण्णा मगर, श्रीधर तवले, रफिक शेख, रशीद शेख, विनायक वाघमारे, रेणुकादास भोंदे, हसनाळे साहेब, रमेश बनकर, बाळासाहेब चव्हाण, बाबा मगर , उमेश वाघमारे,सजय बनकर, अशोक मगर, रामा म्हस्के , पप्पु शेटे, शिराज शेख, सोमा तोडमल,शिवाजी तवले, माजी उपसरपंच अरुण ससे,युवाशक्ती ग्रामविकास संघटन जिल्हा अध्यक्ष दादासाहेब विधाते, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकिय अधिकारी, वनरक्षक, प्राथमिक शाळेचे मुध्याधापक व जेऊर गावचे नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .