प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : दि. 25 डिसेंबर रोजी राहाता तालुक्यातील नांदूर येथे झालेल्या वृक्षतोडी बाबत राहाता येथील वृक्षप्रेमी व अधिकारी यांच्यामध्ये मुंबई येथे मिटींग संपन्न झाली. यामध्ये वृक्षप्रेमी व अधिकारी उपस्थित होते या झालेल्या बैठकीत सांगण्यात आले की वृक्षतोडीमुळे मानवी जीवनाला मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत असून आत्तापर्यंत अशी अनेक प्रकारची वृक्ष आपण बघितली असेल पण आता पर्यंत कोणतेच झाडं मानवी जीवनासाठी धोक्याचे ठरलेले नाही.
यापेक्षा त्यापासून आपल्याला फायदाच आहे. थोडी फार प्रमाणात धोकादायक वनस्पती व वृक्ष आहेत पण ते जास्त करुन जंगलामध्ये व अमेरिका या देशात जास्त आढळतात. जी जीवघेणे देखील ठरतात.पण ही जी काही वृक्षतोड केली जातं आहे यांच्या माध्यमातून प्राणी मात्रा व पक्षी यांची घरे उध्वस्त होतं आहे व या सर्व प्रकारात त्यांचा जीव देखील जातो. त्यामुळे दोन्ही बाजूने गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. त्यामुळे वृक्षतोड करणे टाळावे अशी विनंती करावी, हा होणारा सर्व प्रकार रोखण्यात यावा व यासाठी आपण सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.
यापुढे कोठेही वृक्षतोड झाल्यास आम्हाला त्या ठिकाणचा फोटो काढून पाठवावा.त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाही करण्यात येईल.
श्री विठ्ठल ठोंबरे पाटील (वृक्षप्रेमी ) मो.9112870707
आता वेळ आली आहे आवाज उठवण्याची..हात द्या,आम्ही साथ देऊ…
राहाता तालुक्यातील नांदूर येथे झालेल्या वृक्षतोडीबाबत वृक्षप्रेमी व अधिकाऱ्यांमध्ये मुंबई येथे मिटींग संपन्न

0Share
Leave a reply