पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहमदनगर जिल्ह्यात एक भयानक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला.या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे २.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातात निलेश रावसाहेब भोर – देसवडे, प्रकाश रावसाहेब थोरात-वारणवाडी ( ता-पारनेर, जि. अहमदनगर ), अशोक चिमा केदार, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी (रा.जांबुत खुर्द, ता- संगमनेर, जि. अहमदनगर), सचिन कांतीलाल मंडलीचा-टाकळी मानूर ( ता- पाथर्डी, जि. अहमदनगर ) हे मयत झाले आहेत, तर भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एसटी चा पत्र लागल्याने सुयोग अडसूळ -जखमी देवेंद्र गणपत वाडेकर, व बद्रीनाथ विठ्ठल जगताप हे तिघेजण जखमी झाले आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक सतीश बारवकर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
नगर कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे तिहेरी भीषण अपघात, आपघातात ६ जण ठार तर ३ जण जखमी

0Share
Leave a reply