राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे निवेदन देण्यास आले निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची मते घेण्यासाठी अनेक ठिकाणी वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार संपूर्ण वीज माफ करणार अशा प्रकारच्या गर्जना केल्या होत्या त्याचा विसर सरकारला पडला असल्याचे दिसून येत आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार याचा सरकारने याचा जाब द्यावा जोपर्यंत दिलेली आश्वासन पुरे होत नाही तोपर्यंत कुठलाही प्रोग्राम मध्ये शेतकऱ्यांनी यांना जाब विचारावा आणि ही मागणी पूर्ण झाली नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांना राष्ट्रीय समाज पक्ष राहुरी येथे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब जुंधारे, तालुकाप्रमुख शिवाजी खेडेकर, उपप्रमुख जबाजी बाचकर, अल्पसंख्याक अध्यक्ष बिलाल शेख, गटप्रमुख कमालभाई शेख आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले व शासनाने याची दखल घ्यावी अशी तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे विनंती केली
शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकार पाळणार कधी ? राहूरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

0Share