Disha Shakti

राजकीय

रासपच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रासप शिष्टमंडळाने श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन दिले.राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात असून शेतीचे अर्थकारण दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतमजुरांचे उत्पन्न शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे, तसेच दररोज सुमारे आठ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत रासपने सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, अन्यथा रासपकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. हे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनापर्यंत पोहोचविण्यात आले.या निवेदनावर रासप जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ खेमनर (अहिल्यानगर), युवक जिल्हाध्यक्ष गणेश राशीनकर (अहिल्यानगर), महिला तालुकाध्यक्ष अनिता आढाव (श्रीरामपूर), सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष इनायत अत्तार (अहिल्यानगर), शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दादासाहेब कुसेकर (अहिल्यानगर), शहराध्यक्ष सचिन लाटे (श्रीरामपूर), तालुकाध्यक्ष अण्णासाहेब मुंजाळ (श्रीरामपूर), राजेंद्र जमदाडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!