अहिल्यानगर प्रतिनिधी / जीतू शिंदे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रल्हाद पाटील समवेत जिल्हा अध्यक्ष आत्माराम कुंडकर, उपजिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनर, जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब जुंधारे, बिलाल शेख, मुनीर शेख, गोवर्धन शेळके, जितेंद्र वाघ, सुनील शिंदे, अनिस सय्यद, युसुफ सय्यद, अशोक मुळे, अभिषेक कुंडकर, महेश गवळी, नितीन गायकवाड, वंदना आढाव, दादासाहेब कुसेकर, आर्यन खिल्लारे, संकेत गायकवाड, बापू बिरके, शहाजी कोरडकर, भगवान करवर, मंदाकिनी बडेकर, शहाजी सरक, शिवदास पिसाळ, तात्या गोसावी, मिनीनाथ थोरात, केशव सरक आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांची उत्पन्न जास्तीचे आहेत. शेती करणे नुकसानीचे बनले आहे. महाराष्ट्र मध्ये दिवसाला ८ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की. आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढून पणा करू नये.
उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांची कर्ज राईट मारताना समिती स्थापन केली जात नाही. पण ३६ लाख शेतकऱ्यांना २५ हजार कोटीची कर्जमाफी करताना समितीचा हट्ट कशासाठी? मेट्रो ट्रेन साठी १ लाख ८ हजार कोटीची तरतूद करू शकतात शेतकऱ्यांच्या विरोध असताना ८६ हजार कोटी शक्तिपीठ महामार्गासाठी दिले जातात व ३६ हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी दिले जातात मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्याच प्रमाण वाढल आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण? त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफी करावी व सातबारे कोरे करावे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची मागणी

0Share