राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री मा.महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांच्या सूचनेनुसार मिशन 2024 शिर्डी लोकसभा मतदार संघात निघणार जन स्वराज यात्रा श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहमध्ये सर्व वरिष्ठ नेते,जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जन स्वराज यात्रा पूर्व नियोजन बैठक पार पडली.
राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा दिनांक 23 व 24 सप्टेंबर या दोन दिवसात ही यात्रा पार पडणार आहे. साडेतीन शक्ती पिठापैकी अर्धशक्ती पिठ कोल्हार येथे असलेले भगवती मातेचे दर्शन घेऊन यात्रेची सुरावत होणार असून नेवासा येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत सांगता सभा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेतील शैक्षणिक सामाजिक प्रश्न, सर्व समाज्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत ही यात्रा पोहोचणार असल्याचे सय्यदबाबा शेख यांनी सांगितले.आगामी निवडणुका रा.स.प.स्वबळावर लढविणार असून जनते मध्ये परिवर्तन घडून जनतेचे सरकार महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा संघर्ष आहे.असे वक्तव्य शरद बाचकर यांनी केले.
किमान 200 चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने ही जन स्वराज यात्रा संपूर्ण उत्तर अहमदनगर जिल्ह्यात राहुरी ,नेवासा ,श्रीरामपूर ,संगमनेर ,अकोले, राहता ,कोपरगाव या मतदार संघातून फिरणार आहे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब काटकर यांनी केले तर आभार डॉ. सुनील चिंधे यांनी मानले .
याबैठकी वेळी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख, राज्य सचिव रवींद्रजी कोठारी, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.प्रल्हाद पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदराव बाचकर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत मतकर, उत्तर महाराष्ट्र सदस्य रभाजी पाटील खेमनर, अ,नगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, शिर्डी लोकसभा अध्यक्ष सुनिल चिंधे, जिल्हा सचिव दत्तात्रय कचरे, युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनर, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर, शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब जगताप, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुनीरभाई शेख, रासप नेते उमेश बाचकर, नेवासा विधानसभा अध्यक्ष संतोष काळे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष गोरक्षनाथ येळे, श्रीरामपूर शहर अध्यक्ष सचिन लाटे, राहता तालुका अध्यक्ष रमेश बनकर, संगमनेर तालुका अध्यक्ष सोपानराव तांबडे, नेवासा तालुका अध्यक्ष गोरख होडगर, संगमनेर तालुका संपर्क प्रमुख बाळासाहेब वावरे, राहुरी तालुकाध्यक्ष शिवाजी खेडेकर,कोपरगाव तालुकाध्यक्ष आशुतोष जाधव, अकोले तालुकाध्यक्ष भगवान करवर, राहुरी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष बिलाल शेख, रासप नेते दादासाहेब कुसेकर, युवा नेते प्रवीण बनकर, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा नियोजन बैठक संपन्न

0Share